corona
corona 
छत्रपती संभाजीनगर

Breaking : औरंगाबाद शहरात या तारखेपासून जनता कर्फ्यू 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे औरंगाबाद शहरात १० ते १८ जुलै दरम्यान जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय सोमवारी (ता. सहा) झालेल्या प्रशासकीय अधिकारी व सर्वपक्षीय लोकप्रतिनिंच्या बैठकत घेण्यात आला. जनता कर्फ्यू असला तरी संचारबंदीची काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या चार दिवसात नागरिकांनी तयारी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरासोबतच ग्रामीण भागातही घट्ट होत आहे. वाळूज व परिसरातील सात ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. त्यामुळे वाळूजला चार जुलैपासून संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळे शहरातही संचारबंदी लागू करायची का? यासाठी सोमवारी बैठक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, महापालिका, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाची विभागीय आयुक्तालयात बैठक झाली. बैठकीला खासदार भागवत कराड, आमदार हरिभाऊ बागडे, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, अंबादास दानवे यांच्यासह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, घाटीच्या डीन कानन येळीकर यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

दरम्यान उदय चौधरी यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लोक सहकार्य करीत आहेत. सर्वांच्या चर्चेतून १० पासून १८ जुलैपर्यंत जनता कर्फ्यु लागू करण्यात येईल. नागरिकांनी आतापासूनच किराणा, भाजीपाला आणून ठेवावा. कोणीही पॅनिक होऊ नका, तयारी करण्यासाठी दिवसाचा वेळ आहे. त्यामुळे प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभागी व्हावे, याकाळात आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत. 

हे राहणार बंद 
जनता कर्फ्यूच्या काळात फळ, भाजीपाला, किराणा दुकाने बंद ठेवले जाणार आहेत. असे असले तरी कुणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी महापालिकेचे आयुक्त घेतील असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT